हातकणंगले :शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले तरच कौशल्यपूर्ण पिढी निर्माण होईल. तसेच सर्वसामान्यांना शिक्षण मिळत राहण्यासाठी सरकारी शाळा महत्वपूर्ण असून त्या टिकवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे मत *आमदार राजूबाबा आवळे* यांनी व्यक्त केले. अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठात आयोजित मुख्याध्यापकांच्या 60 व्या राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाच्या उदघाटनावेळी ते बोलत होते. दिवसीय संमेलनासाठी राज्यभरातील हजारो मुख्याध्यापक उपस्थित राहिले .
कार्यक्रमास संजय घोडावत ग्रुपचे प्रमुख संजय घोडावत, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार उल्हास पाटील, संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब आवारी, संमेलनाध्यक्ष खंडेराव जगदाळे, दादासाहेब लाड, के. एस. ढोमसे, मोहन सोनवणे, अशोक पारधी, प्राचार्य बाळ डेळेकर आदी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments